Posts

Showing posts from April, 2025

ताणतणावातून दिलासा देण्यासाठी विनोदी कलाकृतींची भूमिका मोलाची : डॉ. संदीप पाचपांडे गुलकंद चित्रपटातील कलाकारांचा एएसएम संस्थेतर्फे सत्कार

Image
    पिंपरी येथील एएसएम संस्थेच्या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात 'गुलकंद' चित्रपटाच्या कलाकारांचा सत्कार करताना अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे आणि इतर मान्यवर पिंपरी : ता. 28 (प्रतिनिधी)  अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेच्या ताणतणावातून दिलासा देण्यासाठी विनोदी कलाकृती मोलाची भूमिका बजावत आहेत. मराठी विनोदी चित्रपट आणि मालिकांची ही परंपरा प्रदर्शित होणारा 'गुलकंद' चित्रपट कायम राखेल, असा विश्वास औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी सोमवारी (दि.28) व्यक्त केला.   पिंपरी येथील एएसएम संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सह निर्माता सचिन मोटे विनोदी अभिनेते समीर चौघुले, प्रसाद ओक, अभिनेत्री ईशा डे आणि कलाकारांचा डॉ. संदीप पाचपांडे यांच्या हस्ते फुलरोपे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या विश्वस्त डॉ. प्रीती पाचपांडे, कलाकार शर्विल आगटे, दशरथ सिरसाठ आणि गणेश चौधरी, समन्वयक लक्ष्मीकांत गुंड आदी मान्यवर उपस...

'एआय'च्या युगात माध्यमांपुढे सृजनशीलता आणि विश्वासार्हता टिकविण्याचे आव्हान - राजीव खांडेकर मावळ ऑनलाईन' न्यूज पोर्टलचे लोकार्पण

Image
तळेगाव दाभाडे, ३० एप्रिल - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) ने संपूर्ण मानवी जीवन व्यापून टाकायला सुरूवात केली आहे. एआयच्या अथांग गुहेत आपण प्रवेश केला असून प्रत्येकजण चाचपडत आहे. 'एआय'ला विविध मानवी भावभावनांची जोड देण्याचे प्रयत्न सध्या आहेत. पुढे आणखी काय-काय परिणाम होणार आहेत, याविषयी आताच कोणालाही काहीही ठामपणे सांगता येणे कठीण आहे.  या पार्श्वभूमीवर सृजनशीलता तसेच विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रसार माध्यमांपुढे असणार आहे, असा इशारा एबीपी न्यूज व एबीपी माझा या नामवंत वृत्तवाहिन्यांचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी दिला. 'पुणे इन्फो मीडिया'च्या 'मावळ ऑनलाईन डॉट कॉम' या न्यूज पोर्टलचे लोकार्पण राजीव खांडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तळेगाव दाभाडे येथील योगीराज हॉलमध्ये झालेल्या शानदार संभारभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक 'अंबर'चे संपादक सुरेश साखवळकर होते. मावळाबरोबरच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळ ऑनलाईनचे संस्थापक संचालक विवेक इनामदा...

“हाती होते शून्य तरीही...” पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न

Image
तळेगाव दाभाडे दि.३० (प्रतिनिधी)  "वडिलांविषयी असलेल्या कृतज्ञापोटी मुलाने लिहिलेले आत्मचरित्र हे आजच्या युगात अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सर्वसामान्य वडिलांची संघर्ष कथा म्हणून हे पुस्तक निश्चितपणे वाचण्यासारखे आहे." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी केले. लेखक, गडकिल्ले अभ्यासक, म.सा.प. मावळ शाखेचे कार्याध्यक्ष ओंकार वर्तले यांच्या "हाती होते शून्य तरीही .."  या नाविन्य प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन लाखे  यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते  बोलत होते. राजन लाखे यांनी विविध दाखले देत आणि कवितेच्या ओळी उद्धृत करत वडील आणि मुलाच्या नात्याची मोठ्या खुमासदार गुंफण केली.   ओंकार वर्तले यांनी त्यांच्या वडिलांच्या संघर्षावर हे पुस्तक लिहिले आहे. मसाप मावळ शाखेच्या वतीने  मोठ्या दिमाखात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते राजेंद्र घावटे, ज्येष्ठ विधिज्ञ हेमंत भोपटकर,  म. सा. प. मावळ शाख...

प्रा. गुलाब शिंदे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Image
तळेगाव दाभाडे दि. 30 (प्रतिनिधी) इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या  फार्मसी महाविद्यालयातील प्रा.गुलाब शंकरराव शिंदे यांना अपेक्स युनिव्हर्सिटी जयपूर राजस्थान या विद्यापीठाची फार्मासुटिकल सायंन्स या विषयात  विद्यावाचस्पती, पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली. डॉ. गुलाब शिंदे यांनी  "फॉर्मुलेशन अँड इव्यालुअेशन ऑफ हर्बल फिल्म फॉर्मिंग स्प्रे हॅविंग वुन्ड  हिलिंग ऍक्टिव्हिटी" या विषयावर शोध प्रबंध सादर केला. या शोधप्राबंधासाठी  जयपूर येथील डॉ.पंकजकुमार शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे , कार्यवाह  चंद्रकांत शेटे , विश्र्वस्त निरूपा कानिटकर, संस्थेचे सर्व विश्वस्त,  प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आणि इंद्रायणी विद्या मंदिर परिवारातील  सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी  सर्वांच्या वतीने डॉ. गुलाब शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. डॉ.संदीप गाडेकर  संपादक मो.8208185037 महाऑ...

तळेगाव दाभाडेमध्ये ०२ मे रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन

Image
  तळेगाव दाभाडे दि. 29 (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्था व आर.एम.के. स्पेसेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तळेगाव, चाकण, कान्हे, उर्से, टाकवे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी दिली.          हा नोकरी महोत्सव येत्या ०२ मे रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ या वेळेत तळेगाव दाभाडे येथील यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, इंद्रायणी महाविद्यालय येथे होणार आहे. यामध्ये दहावी, बारावी, डिप्लोमा, आयटीआय, इंजीनियरिंग, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.ए., बी.कॉम, बी.बी.ए., बी.सी.ए. उत्तीर्ण असलेल्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. याचा जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.         या नोकरी महोत्सवाचे नियोजन ॲड. अभिजीत आवारे, विशाल लोखंडे व महेश निंबाळकर, तसेच इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्रा...

राष्ट्र प्रथम मानणारी पिढी तयार झाली पाहिजे - कृष्णकुमार गोयल

Image
खडकी दि. 26 : राष्ट्र प्रथम, आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून सर्वांनी राष्ट्रासाठी काम करणे, हे अत्यंत महत्त्वाचे असून येणाऱ्या काळात, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हेच एकमेव ध्येय ठेवून राष्ट्रासाठी आपला उभा जन्म देणारी पिढी तयार व्हायला हवी. भारत भारतीचा उपक्रम या दृष्टीने अखंड भारतात झाला पाहिजे, असे गौरव उद्गार श्री.कृष्णकुमार गोयल यांनी काढले, खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये भारत भारती या संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा समारंभ आज आयोजित करण्यात आला होता, यावेळी भारत भारतीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अचल जैन, भारत भारती चे पुणे जिल्ह्याचे समन्वयक समीर पंड्या, किरण अस्तगावकर, उपाध्यक्ष अनिल मेहता, खडकी शिक्षण संस्थेचे चिटणीस आनंद छाजेड, संस्था पदाधिकारी रमेश अवस्थे राजेंद्र भुतडा आणि संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अचल जैन यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, समाजामधील विविध जाती धर्मांमध्ये जातीय सलोखा आणि शांतता नांदावी सर्वांनी बंधुभावाने वागावे यासाठी भारत भारती ही सं...

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) चे राज्यस्तरीय अधिवेशन पालघर येथे संपन्न

Image
पालघर दि. २६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) चे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी पालघर येथे उत्साही वातावरणात राज्याचे अध्यक्ष शिक्षक नेते  श्री.जी.के. थोरात सर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे संपन्न झाले.  सदर अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाच्या प्रथम सत्रामध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन करताना आदरणीय शिंदे साहेबांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक समस्यांवर आपले मत व्यक्त केले व भविष्य काळामध्ये या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र राज्य  शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना शिक्षण क्षेत्रातल्या विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने शिक्षक व शिक्षकेतर भरती, शिक्षकांची अशैक्षणिक कामे, पवित्र पोर्टल, निवड श्रेणी,पेसा अंतर्गत भरती या समस्यांचा समावेश होता. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांच्याबरोबर टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र मीटिंग चे आयोजन करून त्या सोडवण्याबाबत...

श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे उत्साहात आयोजन

Image
तळेगाव दाभाडे दि.२६ (प्रतिनिधी) श्री. स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री. स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत केले होते. आज पुण्यतिथी निमित्त सांगता समारंभास उद्योजक व तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी अखंड नाम जप यज्ञ जीवनात का आवश्यक आहे याचे महत्त्व तसेच जीवनात वेदांचे किती महत्त्व आहे याची माहिती दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे पटवून दिले. मी अजूनही विद्यार्थीच आहे तसेच त्यांना स्वतःच्या आयुष्यात स्वामी सेवेचा आलेला अनुभव त्यांनी कथन केला.   सर्व कर्माचा उद्देश भगवंतालाच (विष्णुला) प्रसन्न करणे होय म्हणुन मनुष्याने नेमुन दिलेले यज्ञ केल्याने उद्दिष्ट साध्य होते. परंतु प्रत्यक्ष विष्णुची सेवा म्हणजेच परब्रम्ह भगवान श्री दत्त महाराजांची सेवा केली तर कर्माच्या सर्व दुःखातुन, दोषातून मनुष्य मुक्त होतो असे देखील त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात वर्षातुन दोन वेळा म्हणजेच श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व श्री दत्त जयंती नि...

'लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे', असं दादांना सांगा, म्हणजे नाट्यगृहाला लवकर निधी मिळेल : मकरंद अनासपुरे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
तळेगाव दाभाडे दि.25 (प्रतिनिधी):  तळेगावकरांची नाट्यगृहाची मागणी पूर्ण होणे अवघड नाही. 'तळेगाव दाभाडेमधील लाडक्या बहिणींनाच नाट्यगृह हवं आहे', असे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना सांगा म्हणजे लवकर निधी मिळेल, अशी मिश्किल टिपणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. दरम्यान, जगभरातील दहशतवाद्यांच्या धर्माविषयी कल्पना काढून टाकून त्यांचा ब्रेनवॉश करण्याचे ईश्वराला साकडे घालतो, असेही अनासपुरे म्हणाले.            अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे तळेगाव दाभाडे शाखेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेते अनासपुरे बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात नांदी, गणेश वंदना व मैत्र यमन रागात सादर झालेल्या सतार वादनाने झाली. दरम्यान, यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रसाद खांडेकर यांना, प्रसिद्ध सतार वादक विदुर महाजन यांना जीवन गौरव पुरस्काराने, तर प्रा. नितीन फाकटकर यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके, प्रगतशील शेतकरी सुनील जाधव, नंदकुमा...

टि.जे.महाविद्यालयाच्या 'टिजम 'या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन

Image
खडकी दि.26 (प्रतिनिधी) : मैत'  हा एक आगळा वेगळा आणि 'हटके' विषय विद्यार्थ्यांना देऊन संपादक मंडळाने विद्यार्थ्यांना लिहायला प्रवृत्त केले याचा अधिक आनंद होतो आहे. विविध जाती धर्मामध्ये जन्म संस्कार व मृत्यू विधीच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्मामध्ये मृत्यू विषयीच्या विविधचाली, रीती, रूढी,परंपरा जशा आहेत, उदाहरणार्थ अंत्यसंस्कार सावडण्याचा विधी, दशक्रिया विधी,तेरावा  याप्रमाणेच मुस्लिम ख्रिश्चन शीख, जैन  व बौद्ध धर्मीयांच्याही मृत्यूनंतरच्या विधी विषयीची माहिती या विशेष अंकामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण अशी दिलेली आहे. त्याबद्दल मनापासून आनंद वाटला, महाराष्ट्रातील संपूर्ण महाविद्यालय विश्वामध्ये असा आगळावेगळा विषय वार्षिक नियतकालिकासाठी नक्कीच यापूर्वीही आलेला नसेल,याची खात्री आहे खरे तर जगणं खूप सुंदर आहे,परंतु अखेरचा निरोप घेताना मरणालाही हसत हसत सामोरे जावे हेच खरे सत्य आहे. " असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुमार गोयल यांनी केले.    खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या मैत या विषयावरील वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन आज श्री कृष्णक...