विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार - डॉ. व्ही. बी.गायकवाड

पुणे दि. 20 (प्रतिनिधी) ज्ञानगंगा घरोघरी या उद्देशाने प्रेरित झालेल्या विचारसरणीला पुढे घेऊन जाण्याकरिता विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी सेवा विभाग आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये पुणे विभागीय केंद्र तर्फे आज आयोजित एक दिवसीय कार्यशाळेमध्ये १५० कर्मचाऱ्यांनी नाव नोंदणी करून सहभाग नोंदविला. पुणे विभागीय संचालक असलेले श्री. गायकवाड पुढे म्हणाले विद्यार्थ्यांच्या समोर एकच पर्याय न ठेवता बहुपर्यायी भवितव्याच्या वाटा त्यांना मोकळ्या करून देणे हे कार्य मुक्त विद्यापीठांतर्गत केले जात आहे. याप्रसंगी उपस्थित डावीकडून एम के सी एल चे डॉ. अविनाश देशमुख महाविद्यालयाच्या केंद्र संयोजक प्रा. मेहनाज कौसर , प्रा. श्वेता कापडी, व्ही. बी. गायकवाड, डॉ. संजय चाकणे, डॉ. प्रकाश देशमुख, अक्षय गामणे यशवंतराव चव्हाण आणि पुणे विभागीय केंद्राचे सर्व पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणाम...